Monday, September 20, 2010



अन उद्याची भेट पुन्हा....

/



ठरवले होते कि चला
आज आठवणीच्या गावा जावे
अन उद्याची भेट पुन्हा
आजच्या जगण्यात ल्यावे ...

सापडतील तिथे तुला
तुझा पहिला वहिला मित्र
झोपाळ्याचा दोरखंड आणि
आट्यापाट्याचे छत्र

थोडे पुढे गेलास कि
शाळा असेलच उघडी
मास्तरांच्या टेबलावरली
लपवशील तू पुन्हा छडी

पटांगणात आल्यावर
आठवेल सकाळचा पाढा
सूर्य नमस्कार आणि
गार वाहणारा तो ओढा

लिंबाखाली बस जरा
तात्या , बुधाजी दिसतील
तुझ्या नव्या अवताराला
कुणब्याच्या पोरी हसतील ...

आडाजवळ ये आता
तो पूर्वीसारखा खोल नसेल
मोट त्याची कधीच काढलेली
अन नुसतीच फिरती रहाट दिसेल ...

मारुतीकड आलास तर
जरा आठव पैलवानकीचे धडे
अन हनम्या मुलाम्याला हरिवलास
तेव्हा खाल्लेले खव्याचे पेढे

माळाकडं फिर आता
उस उभा असल तसाच तवा
नारुश्याची कमळी पहिल्यांदा
थंडीत बिलगली होती जवा

दुपार टळून जाईल
आता घराकडे फिर
जोश्याच्या घरात चा घे
अन मोमिनच्या घरात खा खीर ..

सांज सरून गावकरी
जेव्हा घराकडे येतील
छुन छुन पैंजणाने मग
जीव शिवा परततील ..

दिसलं चांदण मुलखाच
अन चांदण्याबी भारी
अरं गाव सोडून शहरामंदी
नसते जीवन वारी ......

:- सुजित ( धवल ध्रुव )

मी गेल्यावर

मी गेल्यावर इतरांसारखा
तू हि रडू नकोस .
सगळे इथे जमले तरी
तू मात्र आहेस तिथेच राहा ..
आपला एकाधा जुना फोटो पहा आणि हस ...!!
इथे माझ्या अंतयात्रेला देखील येउ नकोस ....
कारण तेव्हाही तुझा विरह
सहन नाही होणार मला .....
आलेच जरका डोळ्यातून तुझ्या अश्रू
तरी मी पुसतोय अस समज ...
कारण माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून
ते देखील लगेच जातील ..
राखे साठी आलास तर ...
फक्त लांबून मला पहा ...
विजल्यावर भरून घे सगळे
..घटात ...

गंगेत सोडल्यावर हर हर म्हणू नकोस ....
मला मोक्ष नकोय ..
तुझ्या सोबत पुन्हा जगावे
म्हणून
देवाला सांगून येतोय ....

माझ्या मित्रा !!!

:- सुजित ( धवल ध्रुव )

मी येतोय ....

कशाला आलात

या भुतांच्या स्मशानात ....??



काय , मला शेवटचे पाहण्यासाठी ?

का आलात आठवणीच्या पुसण्या भेटी गाठी ?



खरं संग आज तुझ्या मनात काय आहे ?

तू हेच म्हणत आहेस ना कि ,'' मेल्या आता तरी मर ...

जिवंतपणी जगू दिले नाही , मेल्या आता तरी मर ."



अगं जिवंत असताना तुझ्या आठवणीने जळत होतो

आता मेल्यावर सरणावर जळत आहे

जिवंत असताना तरी तुझी भेट झाली नाही

आता मात्र ती पूर्ण होणार आहे ......



आज इतकाच फरक आहे

तू जिवंत , मी मेलेलो आहे

तुझ्या हाती बाळ

माझ्या मागे काळ आहे .....



जा सुखी रहा !!

आपला संसार पहा

देवाकडे जाईन आणि म्हणेन

" देवा का रे असा कोपलास माझ्यावर

का नाही केलेस मला तिचा उपवर "

अरे तूच मला निर्माण केले

तूच तिला निर्माण केले

मग कोणत्या फरकाने

आम्हाला वेगळे केले ?

तुझा मात्र विजय झाला

माझी मात्र राख झाली !!"



पुढच्या जन्मात पुन्हा तुझ्या

वाटेवर उभा असेन मी

आताच्या तुझ्या नवऱ्याला

सात जन्म मागे ढकलेन मी ....



फक्त तू तयार रहा

मी येतोय .....मी येतोय .....मी येतोय ....||

:- सुजीत शिंदे ....(धवल ध्रुव)

झाली चूक! क्षमस्व !!

झाली चूक! क्षमस्व !!

वेड असले जन्मांतुनी लागते

कोणाला कधी , कोणाला कशाचे

ते का कधी कुणाला सांगता येते ? ||



मनाचा व्यवहार फसवा नसतो

आणि लागलेले वेड उतरत नसते ||



भटकत फिरलो भणंग आणिक

मिळेल तेथे पाणी प्यालो

अशा काही रात्री गेल्या

ज्यात काळवंडलो असतो

अशा काही वेळा आल्या

होतो तसा उरलो नसतो......||



आणि प्रेम झाले .................;

ते नेहमी अबोधच राहते

अनेकांना काय , बहुतेकांना

त्यात नकारच मिळतो .....||



मग अश्यावेळी आधार देतात

ती जीर्ण शीर्ण झालेली पत्रे

एका पावसाळ्यात लिहिलेली हि असंख्य प्रेमपत्रे

प्रीतीच्या वर्षावात भिजलेले अनंत आर्द्र शब्द ...

हि न संपणारी आश्वासने

कोसळताना दिलेला धीर

कसे निभावून गेलो

कळत नाही, कळत नव्हते



फक्त तुझी आठवून राहावी म्हणून

तेच माझे प्रेमपत्र होते ................!!!

:- सुजीत शिंदे ....(धवल ध्रुव)

घेता अमृताचा प्याला...

ऐसे जाहिले सर्व
जैसे न होते आधी
घेता अमृताचा प्याला
जडल्या जगण्याच्या व्याधी ||

म्हणे देवा मला
मरण नको देऊ रे
अन तरी सुद्धा मला
स्वर्ग सुख लाभू दे ||

मी करीन रोज पाप
तरी मला माफ कर
हंडा जरी भरला पूर्ण
तरी थोडा साफ कर ...||

अरे बायको द्यायची तर दे
पण जरा माझाही विचार कर
निघेल चांगली याची दे ग्वाही
नाहीतर देशील तशी परत कर ..||

एक असावा बंगला
नुसता सोन्याचा महाल
अन ऐशोआरामाची
असावी तिथे धमाल ..||

अजून काय ...??
ह ..गाडीतर कि राहली ..!!
मस्त उडणारी दे
जशी कुणी नाही पाहिली ...||

आता संपले का वरदान सारे ?
कि अजून काही बाकी आहे ..
जाऊ दे आठवत नाही आता काही
तू हि जरा ब्रेक घे ......||

:- सुजित ( धवल ध्रुव )

























तुझी सावली हि वाढली ........

रात्र होती थांबलेली

अन वाराही नव्हता कुठे .........

तुला जळताना पाहताना

नुसता माझ्या भावनांचा पसारा होता तिथे ...................



एकच होतास तू

तुला जोड कुणाची द्यावी ..........

घडवले माझे मला

तुझी ओढ कशी रे जावी ........



लहान होतो तेव्हा

तुझी पावलं मला दिली

जसा झालो जरासा मोठा

तुझी सावली हि वाढली ........



नुसता बिलगायचो तेव्हा

हळूच कुज्बुजायाचा

खेळताना तुही तेव्हा

खूप खूप चिडायचा ...



पावसात जेव्हा भिजायचं तू

तेव्हा कुठे आंघोळ केल्या सारखा वाटायचा

नवी वस्त्रे वागवायचा

सुमधुर पसरायचा ..........



अरे मीच काय तुझ्यासाठी

माझे सारे सवंगडी

जरी तू नाही खेळसी

तरी तुझ्या भोवती खेळती लंगडी ......................



असा जरा मोठा झालो

आता नाही भेटत तुला .............

तरी कधी जरा विसावतो रे

घे सामावून तुझ्या सावलीत मला ...............



आता कुणाच्या सावलीत

सांग उभा राहू

हिंडोळ्याचे झोके

सांग कसे घेऊ ...............



तेव्हा कुठे आज असे खरे पटले .....................

"मनुष्य हि जगातली सर्वात हिंस्त्र आणि वाईट जात आहे ............."



:- माझे घरामागचे झाड जेव्हा जाळले गेले कुणा बिल्डर च्या जागेपायी ............खरच तेव्हा मनुष्य वधाचा गुन्हा लागू झाला त्यावर ...........( पण तो सुटला दुसरे झाड लाऊन ....माझे झाड मला पुन्हा मिळणे नाही ...........)



सुजित ( धवल ध्रुव )












पुन्हा कधी तिने नकार दिला नाही

तो आज आलाय

पुन्हा तिला भेटायला

आधीचा नकार

पुन्हा होकारात बदलायला ...........||



तीच पायरी , तोच जिना ............

माळा ही तोच आणि गच्ची

मोहाचे क्षण , पावसाचे थेंब ...

हवेतला गारवा , लगन सच्ची.............||



पण ती त्या दिवशी नाही म्हणाली होती .......................



आज पाऊस काही करेल काय ??

आणि काय गम्मत ..........

पावसाने काम केले ............

विजा कडाडल्या .....

ती काहीशी घाबरली ...

जराशी मिठीत आली ....

माझीही पकड घट्ट झाली .....

तिचा स्पर्श मला ....

माझा स्पर्श तिला ...

आपसूकच हवा होता ....

गर्द निळ्या आभाळामध्ये

काळा मेघ दाटला होता ....

आल्या प्रत्येक क्षणाला ...

विसरून आम्ही हरवलो होतो

तुझ्या माझ्यात ................

हे खरेच काय आहे ?

जे आजवर अनुभवलं नाही ...

होतं सारं माळरान आपलं

तरी कधी जराही चाखलं नाही .......



तो बरसत होताच ..........

गच्चीच्या दरवाज्यातून

आम्हाला हळूच भिजवत होताच



तिचे ओठ तेव्हा दिसले

आणि परावृत्त नाही झालो

वाढलेल्या पाना मधले

सारे हलाहल प्यालो .....



तीही तशीच अगतिक

रोम रोमात भरत होती

श्वासातील कोवळे

मादकपाणी भरत होती .......



चिंब चिंब भिजलो तेव्हा

पावसा विना

तो तर बाहेर पडत होता

आत तर आम्ही दोघेच ना !!!!!!!!



पुन्हा कधी तिने नकार दिला नाही ...................

पावसाने धरतीला उगाच भिजवले नाही .............



:- सुजित ( धवल ध्रुव )














दूर देशी गेला यार ..............

काल भरपूर नाचला असशिलच ,
आणि झिंगून गेला असशील अगदी ....
मित्र मैत्रिणीच्या ताफ्यात
हरवून गेला असशील अगदी .....

आज थोडी जास्त घेतो .........
काय फरक पडणार आहे ?
नाहीतरी आपण काय
नशेत कुठे पडणार आहे ?

दूर देशी गेला यार
तुला आठवू किती रे ...
दर सांजेला आठव येई
तुलाही येतो का रे ?

असतील किती हाथ तिथे
तुला सांभाळन्या ......
असतील तितकेच खांदे
तुझ्या अश्रुंना वाट देण्या....

अरे असशील तू मजेत अगदी
केलास कधी माझा तू विचार ?
का नाही पुसलास मला
का नाही आला माझा विचार ?

मित्रा मित्र असतात खुप
मला तुझ्याविना कोणी नाही
असतील तुला अगदीच खुप
मलातर तुझ्याविना कुणी आठवत नाही ..

मित्रा मैत्रीत कर एवढा त्याग
असे सांगाया लावू नको
असेल भाव जर मैत्रीचा
तर बोलायला धजू नको

करीन मी तसाही गुजारा
आणखीन काय करू मी ?
विसरु तर नाही शकत
तरी राहू कसा असा मी ?

उद्या उजाडेल तेव्हा
नसेन या जीवनात मी
घेऊन आठवणी तुझ्या
सोडून जग जायींन मी ..

तेव्हा तरी निदान
तेव्हा तरी निदान येशील का ?
दूर देशी गेला यार
पुन्हा परतशील का ??????