Monday, September 20, 2010


























तुझी सावली हि वाढली ........

रात्र होती थांबलेली

अन वाराही नव्हता कुठे .........

तुला जळताना पाहताना

नुसता माझ्या भावनांचा पसारा होता तिथे ...................



एकच होतास तू

तुला जोड कुणाची द्यावी ..........

घडवले माझे मला

तुझी ओढ कशी रे जावी ........



लहान होतो तेव्हा

तुझी पावलं मला दिली

जसा झालो जरासा मोठा

तुझी सावली हि वाढली ........



नुसता बिलगायचो तेव्हा

हळूच कुज्बुजायाचा

खेळताना तुही तेव्हा

खूप खूप चिडायचा ...



पावसात जेव्हा भिजायचं तू

तेव्हा कुठे आंघोळ केल्या सारखा वाटायचा

नवी वस्त्रे वागवायचा

सुमधुर पसरायचा ..........



अरे मीच काय तुझ्यासाठी

माझे सारे सवंगडी

जरी तू नाही खेळसी

तरी तुझ्या भोवती खेळती लंगडी ......................



असा जरा मोठा झालो

आता नाही भेटत तुला .............

तरी कधी जरा विसावतो रे

घे सामावून तुझ्या सावलीत मला ...............



आता कुणाच्या सावलीत

सांग उभा राहू

हिंडोळ्याचे झोके

सांग कसे घेऊ ...............



तेव्हा कुठे आज असे खरे पटले .....................

"मनुष्य हि जगातली सर्वात हिंस्त्र आणि वाईट जात आहे ............."



:- माझे घरामागचे झाड जेव्हा जाळले गेले कुणा बिल्डर च्या जागेपायी ............खरच तेव्हा मनुष्य वधाचा गुन्हा लागू झाला त्यावर ...........( पण तो सुटला दुसरे झाड लाऊन ....माझे झाड मला पुन्हा मिळणे नाही ...........)



सुजित ( धवल ध्रुव )

No comments: