Monday, September 20, 2010















दूर देशी गेला यार ..............

काल भरपूर नाचला असशिलच ,
आणि झिंगून गेला असशील अगदी ....
मित्र मैत्रिणीच्या ताफ्यात
हरवून गेला असशील अगदी .....

आज थोडी जास्त घेतो .........
काय फरक पडणार आहे ?
नाहीतरी आपण काय
नशेत कुठे पडणार आहे ?

दूर देशी गेला यार
तुला आठवू किती रे ...
दर सांजेला आठव येई
तुलाही येतो का रे ?

असतील किती हाथ तिथे
तुला सांभाळन्या ......
असतील तितकेच खांदे
तुझ्या अश्रुंना वाट देण्या....

अरे असशील तू मजेत अगदी
केलास कधी माझा तू विचार ?
का नाही पुसलास मला
का नाही आला माझा विचार ?

मित्रा मित्र असतात खुप
मला तुझ्याविना कोणी नाही
असतील तुला अगदीच खुप
मलातर तुझ्याविना कुणी आठवत नाही ..

मित्रा मैत्रीत कर एवढा त्याग
असे सांगाया लावू नको
असेल भाव जर मैत्रीचा
तर बोलायला धजू नको

करीन मी तसाही गुजारा
आणखीन काय करू मी ?
विसरु तर नाही शकत
तरी राहू कसा असा मी ?

उद्या उजाडेल तेव्हा
नसेन या जीवनात मी
घेऊन आठवणी तुझ्या
सोडून जग जायींन मी ..

तेव्हा तरी निदान
तेव्हा तरी निदान येशील का ?
दूर देशी गेला यार
पुन्हा परतशील का ??????

No comments: